Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय. भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.
वैशिष्ट्ये :
१ ) ऐच्छिक संघटन :
सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असते सर्व सभासद आपल्या समान उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी स्वच्छेने एकत्रित आलेले असतात . समता व एकता यावर त्याचा विस्वास असतो .
२) खुले सभासदत्व:
सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले असते . जात,धर्म ,पंथ ,वंश असा भेद न करता सामान हित असणाऱ्या सर्व व्यक्तीनां संस्थेचे सभासदत्व दिले जाते .
३) नोंदनी :
एकत्रित आलेल्या व्यक्ती समुहाने सहकारी कायद्यानुसार संस्थेची नोंदणी करावयाची
असते . नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते .
४)मतदानाचा समान हक्क /एक व्यक्ती एक मत :
सहकारी संस्थेत 'एक व्यक्ती एक' मत या पद्धतीने सभासदांना मताधिकार दिला जातो . भांडवली संस्थेप्रमाणे एक भाग एक मत असे तत्व नसते .सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालवला जातो .
५) मर्यादित जबाबदारी किंव्हा दायित्व :
सहकारी संस्थेतील सभासदाची जबाबदारी हे मर्यादीत असते . सहकारी संस्थेतील निर्माण होणाऱ्या तोट्यास सभासदना व्यक्तिसाहा जबाबदार धरल जात नाही .फक्त त्यांनी गुंतवलेली रक्कमच जबाबदार धरली जाते.
६) लोकशाही कारभार :
संस्थेचा कारभार लोकशाही तत्वाने चालविला जात असल्यामुळे संस्थेत आर्थिक सत्तेचे केंद्रीयकारण होत नाही. सर्वाना समान संधी प्राप्त होत असते.
७) सभासद संख्या :
समान हित असलेल्या वेगवेगळ्या कुटुंबातील किमान दहा व्यक्ती सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक असतात . जास्तीत जास्त सभासद संख्येवर मर्यादा नाही पण सभासद होणारी व्यक्ती ही त्या विशिष्ट क्षेत्रातील किंव्हा विभागातील असावी असे बंधन असते .
फायदे :
१) सुलभ स्थापना :-
सहकारी संस्था सुरु करण्याची पद्धत सोपी असते . यासाठी कमीत कमी दहा सभासदाची आवश्यकता असते .सहकारी संस्थेच्या नोंदणीची पद्धत कंपनी स्थापनेच्या तुलनेत सोपी व कमी खर्चाची असते .
२) खुले सभासदत्व :
सहकारी संस्थेत समान हित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सभासदत्व प्राप्त करता येते . सभासदत्व दिले जात असताना जात, धर्म , पंथ इत्यादी बाबींचा अडसर येत नाही .तसेच कोणीही सभासद केव्हाही आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊ शकतो.
३)सातत्य व स्थेर्य :
सहकारी संस्था कायद्याने निर्माण झाली असल्यामुळे संस्थेच्या सातत्यावर सभासदांच्या मृत्यू ,दिवाळखोरी ,राजीनामा ,नादारी याबाबींचा संस्थेवर कोणताच परिणाम होत नाही. सहकारी संस्थेला स्वतःची सर्वमान्य नामुद्रा असते .त्यामुडे संस्थेला स्थेर्य लाभलेल असते .
४) वस्तूच्या कमी किमती :
सहकारी ग्राहक भंडारांमध्ये वस्तूच्या किंमती कमीत कमी असतात. कारण मध्यस्थांच्या उच्चाटनामुडे वस्तूच्या किंमती कमी ठेवने सोपे जाते .
५) नफ्याचे समान वाटप :
सहकारी संस्थेत नफ्यातील काही हिस्सा सभासदांचा व काही हिस्सा समाज हितासाठी राखुन ठेवल्या जातो . संस्थेत नफ्याची वाटणी हि समान तत्त्वावर केली जाते . नफ्याची वाटणी करतांना गुंतवणूक विचारात घेतली जात नाही.
६ ) मर्यादित जबाबदारी :
सहकारी संस्थेच्या सभासदांची जबाबदारी किंव्हा देयता त्यानीं खरेदी केलेल्या भागांवर न दिलेल्या रक्कमे येवडिच मर्यादित असते .त्यामुळे सभासदांच्या व्यक्तिगत अथवा खाजगी मालमत्तेवर टाच आणून संस्था आपली देणी भागवू शकत नाही .
तोटे :-
१) मर्यादित भांडवल :
सहकारी संस्थेचे सभासद हे मध्यम व कमी उत्पन्न गटातील असतात .त्यामुळे त्यांची बचत कमी असते .कमी बचती मुळे ते जास्त भांडवलाची गुंतवणूक करू सकत नाही .शिवाय व्यवस्थापनात ' एक सभासद एक मत ' हा नियम असतो व लाभांश दरात मर्यादा (जास्तीत जास्त १५% दराने ) असते . या सर्व कारणांमुळे सहकारी संस्थेला कंपनी प्रमाणे मोठया प्रमाणात भांडवल उभे करणे अशक्य असते .
२) अकार्यक्षम व्यवस्थापन :
व्यवस्थापन समितीचे सभासद सक्रिय असतात .परंतु पुष्कळदा त्यांच्यात व्यापार कौशल्य ,तांत्रिक ज्ञान व अनुभव यांचा अभाव असतो . तसेच ,कर्मचारी वर्गाचे पगारही आकर्षक नसतात . या कारणा मुळे सहकारी संस्थांना व्यवस्थापनात ,सुशिक्षित ,अनुभवी ,कुशल, व कार्यक्षम अशा व्यक्ती लाभत नाहीत . परिणामी ,व्यवस्थापन अकार्यक्षम बनते .
३) गुप्ततेचा अभाव किंव्हा लोकांचा अविश्वास :
सहकारी संस्थेत व्यवसायिक गुप्तता पाळली जात नाही . कारण सभेद्वारे सर्व बाबी सार्वजनिक केल्या जातात .
४) निष्क्रिय सहकारी संस्थेत वाढ :
भारतात असंख्य सहकारी संस्था निष्क्रिय स्वरूपाच्या आहे . या संस्थांची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी झालेली असते . पण त्या संस्थेचे कोणतेही कार्य चालू नसते . संचालक मंडळाची निवड नाममात्र असते . अशा सहकारी संस्थेची संख्या भारतात वाढत चालली आहे .
५) सभासदांमधील मतभेद :
सहकारी संस्थेच्या सभासदांमध्ये समानता निस्वार्थीपणा व सेवा यात एकमत असलेतरीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि निवडणुका यावरून गट निर्माण होऊन सभासदान मध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते .त्याचा परिणाम सहकारी संस्थेवर होतो .
६) मर्यादित विस्तार :
सहकारी संस्थेकडे असलेल्या मर्यादित भांडवलमधून सहकारी संस्था तज्ञ व कुशल व्यवस्थापकाची नियुक्ती करू शकत नाही . त्यामुळे सहकारी संस्थेचा विस्तार त्या प्रमाणात होऊ शकत नाही .परिणामता विस्तारावर मर्यादा पडते .